ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत स्वावलंबी बनेल – राज्यपाल कोश्‍यारी


पुणे : नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत स्वावलंबी बनेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले.किवळे येथील सिंम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाच्या तिसऱ्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.



यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस.बी. मुजुमदार, फियाट इंडियाचे अध्यक्ष राजेश खत्री, विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार आणि प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिउरकर आदी उपस्थित होते. कोश्‍यारी म्हणाले, सरावाने माणूस परिपूर्ण बनत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामाला कमी न लेखता आत्मविश्‍वासाने काम करावे. केवळ महत्वाकांक्षा बाळगून यशस्वी होता येत नाही तर श्रद्धेने आणि आत्मविश्‍वासाने परिश्रम करण्याची गरज असते. हे गुणच स्नातकांना यशाच्या शिखरावर पोहोचवतील. विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यापीठाचा लौकीक उंचावेल असे काम विद्यार्थ्यांनी करावे. कुलपती डॉ. मुजुमदार म्हणाले, तरुणांना पुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्य आवश्‍यक आहे, हे ओळखून सिम्बायोसिस संस्थेने पहिले कौशल्य विकास विद्यापीठ सुरु केले. या विद्यापीठातून बाहेर पडणारा विद्यार्थी आत्मविश्‍वास घेऊन यशस्वी उद्योजक होईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button