ताज्या बातम्यानागपूरमहत्वाचेमहाराष्ट्र

भातासोबत आता खायचं तरी काय? पंधरा दिवसात तूर डाळ १५ रुपयांनी महागली


नागपूर : एकीकडे खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईमुळे नागरिकांचे घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी ताटातून वरण गायब होण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरा दिवसात तूर डाळ १५ रुपयांनी महागली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तर १६० रुपये किलोवर पोहोचला आहे.



नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत. देशात तूर डाळीचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तूर डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यास आणि राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी जमा केलेल्या साठ्याची माहिती सरकारला देण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर राज्यांना सध्याच्या तूर साठ्याचा डेटा ग्राहक व्यवहार विभागाच्या ऑनलाइन

ताटातून वरण गायब

मॉनिटरिंग पोर्टलवर अपडेट करावा लागणार आहे तसे आदेशही काढले आहेत. तूर आणि उडीद डाळीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत साठ्यावर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button