ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन मंत्री राज्य सांभाळण्यास सक्षम आहेत-आमदार बच्चू कडू


अमरावतीः दिव्यांगाना कमजोर समजणे म्हणजे नाना पटोले यांचा नासमजपणा आहे. ते लोक तुमच्यापेक्षाही सक्षम असल्याचे आमदार बच्चू कडूंनी नाना पटोले यांच्या दिव्यांगांवरील वक्तव्यानंतर सांगितले.
तसेच नानांनी आपले शब्द मागे घ्यावे अशी मागणी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेधही केला.

पुढे कडू म्हणाले, राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन मंत्री आहेत. असे पहिल्यांदा झाले नसून यापूर्वीही अनेकदा झाले आहे. ते दोघेही राज्य सांभाळण्यास सक्षम आहेत. त्यांच्यासमोर काही अडचणी असल्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला गेला आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही तरी, शेतकऱ्यांचे काही नुकसान झालेले नाही. त्यांना विविध सवलती देण्याच्या घोषणा राज्यसरकारने केल्या आहेत. मदत भेटली नाही असं होणार नसून तसे झाल्यास आम्ही आधी शेतकऱ्याच्या पाठीशी राहू मग सरकारच्या अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button