जनरल नॉलेज

प्रियकराचे तुकडे करणारी डॉक्टर ओमाना जामीन मिळाल्यावर इंटरपोलच्याही का हाताला लागली नाही?


लाडकी असलेली ओमाना अभ्यासातही हुशार होती. तसं तिची सगळी भावंडसुद्धा हुशारच होती आणि आज तिची भावंडं चांगल्या हुद्दावर कामही करतायत.



 

तर, ही ओमाना अभ्यासात हुशार होती. आय स्पेशालिस्ट म्हणून तिनं डॉक्टरकी पूर्ण केली. त्यानंतर घरच्यांनी तिचं एका डॉक्टर सोबतच लग्न जुळवलं. त्याचं नाव डॉक्टर राधकृष्णन.

 

दोघांचं लग्न झालं आणि सुखी संसाराला सुरूवात झाली. दोघांना दोन मुलंही झाली. संसार व्यवस्थित सुरू होता. काही वर्षांनी मग त्यांनी राहतं घर रिनोव्हेट करायचं ठरवलं. त्यासाठी मुलरलीधरन नावाच्या आर्किटेक्टला बोलवलं. या मुरलीधरनने दोन-तीन प्लॅन दाखवले. त्यातला एक प्लॅन डॉक्टर जोडप्याने निवडला आणि घराचं काम सुरू झालं.

 

इथे या गोष्टीमध्ये ट्वीस्ट आला.

हा मुरलीधरन दिसायला रुबाबदार होता, कामाच्या बाबतीत कष्टाळू होता आणि बोलण्याच्या बाबतीत अगदी गोडबोला होता. कुणालाही सहज त्याचा लळा लागेल असा हा मुरलीधरन. परिणाम असा झाला की, ओमानालाही त्याचा लळा लागला.

घराचं काम सुरू असताना राधाकृष्णन पासून लपून-छपून ते भेटू लागले. कधी काम सुरू असलेल्या घरात तर कधी बाहेर भेटायचे. सुरूवातीला फक्त मैत्री होती पण, हळू हळू ही मैत्री प्रेमात बदलली. भेटणं वाढू लागलं. जवळीक वाढली.

असली अनैतिक नाती फार काळ लपून राहत नाहीत. त्याची चाहूल हळू हळू सगळ्यांनाच लागते. या दोघांच्या बाबतीतही तसंच झालं. ओमानाच्या अनैतिक संबंधांबाबत राधाकृष्णनला समजलं. त्याने एका सुज्ञ माणसाप्रमाणे ओमानाला समजवण्याचा प्रयत्न केला.

ओमाना मात्र मुरलीधरनच्या प्रेमात नखशिखांत बुडाली होती. बरं-वाईट, योग्य-अयोग्य याची शुद्धच तिला उरली नव्हती.

तिनं काही राधाकृष्णनचं म्हणणं ऐकलं नाही. परिणामी राधाकृष्णनने ओमानाला घटस्फोट द्यायचा ठरवलं. घटस्फोटावेळी त्याने दोन्ही मुलांना मात्र, ओमानाकडे न देता स्वत:कडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. ओमानालाही नेमकं हेच हवं होतं. तिला संसारातून मूक्त व्हायचं होतं. मुक्त होऊन तिला प्रेम करायचं होतं.

तिच्या मनासारखं झालं. आता ती मोकाट सुटली. मुरलीधरनला बिनढोकपणे भेटू लागली. संपुर्ण शहरात आता त्यांच्या संबंधांविषयी बोललं जाऊ लागलं. तिची नामुश्की व्हायला लागली. तिला काही नामुश्कीची फिकीर अजिबात नव्हती.

तिला त्रास व्हायला लागला तो पेशंट्सने तिच्याकडे पाठ फिरवल्यावर. आता तिला पैसे कमी पडू लागले.

अश्यावेळी मग सहाजीकच तिने मुरलीधरनकडे लग्न करण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर तिला समजलं की, मुरलीधरनचं सुद्धा लग्न झालेलं होतं आणि त्यालाही दोन मुलं होती. त्यामुळे त्याने लग्न करायला नकार दिला. या गोष्टीचा तिला इतका त्रास झाला की, तिने थेट केरळ सोडण्याचा निर्णय घेतला.

कॅबवाल्याने मग दुसरी गाडी बघुन दिली. या नवीन गाडीचा ड्रायव्हर बॅग गाडीत ठेवावी म्हणून उचलायला गेला तर, ती त्याच्यावर भडकली. त्याला थोडं विचित्र वाटलं, पण त्याने दुर्लक्ष केलं. आता गाडीतून जाताना त्याला त्या बॅगमधून दुर्गंध येत होता म्हणून त्याने विचारलं की बॅगमध्ये काय आहे?

यावर ओमानाने नवीन चाल खेळली. ती म्हणाली,

“यात एक मृतदेह आहे. त्याची विल्हेवाट लावायला माझी मदत करशील तर, तुला पैसे सुद्धा देईन.”

तो कॅबवालासुद्धा तयार झाला. आता ओमानाचं टेन्शन कमी झालं. तिला गाडीतच थोडी डुलकी लागली. जेव्हा डोळा उघडला तेव्हा गाडी पोलिस स्टेशन मध्ये होती.

पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. पाच वर्षांपर्यंत ही केस चालूच होती. २००१ साली मग, तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला. तेव्हा ती जे तुरूंगातून बाहेर आली ते मग कुठे गायब झाली कुणालाच महिती नाही.

२००१ साली शेवटी तिचा चेहरा लोकांनी बघितला होता, पण १६ वर्षांनी २०१७ साली जेव्हा तिच्यासारखा चेहरा लोकांना दिसला तेव्हाही लोकांना तीच आठवली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button