ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

3 गाण्यासाठी 3 लाख घेते, इंदुरीकर महाराजांच्या आरोपावर गौतमी पाटील हिची पहिलीच प्रतिक्रिया..


सोलापूर : नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या डान्ससाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. पण सध्या गौतमी आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आलीये. गौतमी पाटील आता लवकरच सिनेमात दिसणार आहे. घुंगरू चित्रपटाच्या माध्यमातून गौतमी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. माढ्यात या सिनेमाचं चित्रीकरण आता पूर्ण झालं आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घुंगरू सिनेमा लोककलावंताची व्यथा मांडणारा आहे. त्यामुळे घुंगरू महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक करत असतात. प्रेक्षकांमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. माझ्यावर जसं प्रेम केलं, तसंच घुंगरू चित्रपटावरही प्रेम करावं. हा सिनेमा पाहावा. हा माझा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे चित्रपटात अभिनय करताना अनेक अनुभव आले, असं गौतमी पाटीलने सांगीतले



गौतमी पाटील पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार आहे. घुंगरू असं या सिनेमाचं नाव आहे. घुंगरू सिनेमाच्या माध्यमातून तिचं मोठ्या पडद्यावर आगमन होत आहे. माढ्यात या सिनेमाचं शेवटचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या सिनेमाकडून गौतमीला प्रचंड अपेक्षा आहेत. याविषयी ती भरभरून बोलली. लोककलावंताची व्यथा मांडणारा घुंगरू महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक करत असतात. प्रेक्षकांमुळेच आज मी उभी आहे. माझ्यावर जसं प्रेम केलं तसं महाराष्ट्रातील चाहत्यांनी घुंगरु चित्रपट पाहून प्रेम दाखवावं, असं आवाहन करतानाच चित्रपटात अभिनय करताना अनेक अनुभव आले, अशी माहिती तिने दिली.

सोलापूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर इंदुरीकर महाराज यांनी टीका केली होती. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते.

आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो. गौतमीच्या कार्यक्रमात राडा होतो. मुलांचे ढोपर फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिलं जातं. आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती. इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेवर गौतमी पाटील हिने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, सोशल मीडियातून इंदुरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. त्यांच्याविरोधातील मिम्सही व्हायरल झाले होते. मात्र गौतमीने पहिल्यांदाच इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.

ते महाराज आहेत. मी काय बोलणार त्यांच्याविषयी. फक्त गैरसमज नका करू. महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी ही ध्यानात घ्यावं. मी तिन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. आमच्या टीममद्ये 11 मुली असतात. एकूण 20 जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. आणि तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाली

माझ्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. प्रेक्षक उपस्थित राहून एन्जॉय करतात. इतकी मोठी गर्दी होत असेल तर मी माझ्यासाठी मला संरक्षण मागणारच ना? महाराजच नव्हे तर कुणीही काही बोललं, टीका केली तरी माझं काम सुरt आहे. मला काही अडचण नाही. कारण मी कशी आहे हे माझं मला माहिती आहे. मी मानधन किती घेते ते मला माहीत आहे. कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना माहीत आहे. आज मी पुन्हा उभी राहीलीय. ती फक्त प्रेक्षकांमुळेच. प्रेक्षकांनी मला कोणत्याही गोष्टी जाणवू दिल्या नाहीत. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी सपोर्ट केल्यामुळे मी जिद्दीने अडचणीच्या काळात उभा राहिलीय, असंही ती म्हणाली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button