ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा – आमदार नीतेश राणे


मुंबई : महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात अल्पवयीन हिंदु युवतींची फसवणूक करून त्यांचे धर्मांतर करण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी धर्मांधांना आर्थिक साहाय्य केले जाते.
मोटारसायकलची सोय केली जाते. यासाठी हिंदु युवतींचे दरपत्रक (रेटकार्ड) निश्‍चित करण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करून भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बळजोरीने किंवा आमीष दाखवून कुणाचेही धर्मांतर केले जाऊ शकत नाही. या विरोधात कारवाई करण्यासाठी कायदे अधिक कडक केले जातील, तसेच आवश्यकता असल्यास नवीन कायदा केला जाईल’, अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली.



वर्ष २०१९ मध्ये नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील इयत्ता ७ वीमध्ये शिकणार्‍या हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण करून इम्रान कुरेशी या धर्मांधाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या मुलीशी निकाह करून तिचे बळजोरीने धर्मांतर केले. त्यानंतर ३ वर्षे या मुलीचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी तक्रार करूनही स्थानिक पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी आरोपीवर कारवाई केली नाही.
अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण महाराष्ट्रात वाढत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून राणे यांनी धर्मांतरबंदी कायदा करण्याची, तसेच आरोपीला पाठीशी घालणार्‍या पोलीस निरीक्षक संजय सानप यांना बडतर्फ करावे, अशी मागणी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button