महत्वाचेमहाराष्ट्र

चिरंजीवी यांनी कॅन्सर झाल्याच्या बातमीवर व्यक्त केला संताप; ट्वीट करत प्रकृतीबाबत दिली माहिती


 



मुंबई – साऊथचा मेगास्टार चिरंजीवी यांचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच त्यांना कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे चिरंजीवी यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर चिरंजीवी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत आणि कॅन्सरच्या चर्चांबाबत मौन सोडले आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा कॅन्सर झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

चिरंजीवी यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘काही दिवसांपूर्वी मी एका कॅन्सर सेंटरचं उद्धाटन करताना कॅन्सरबद्दल जागरुकता वाढवण्याची गरज असल्याबद्दल बोललो होतो. मी हेसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्यास कॅन्सर टाळता येऊ शकतं. मी माझ्या आरोग्याबद्दल नेहमीच सतर्क होतो आणि त्यामुळेच मी कोलन स्कोप चाचणी केली. या चाचणीत नॉन-कॅन्सर पॉलीप्सचं निदान झाले आणि नंतर ते काढण्यात आले. मी इतकंच म्हणालो की जर चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. म्हणूनच प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे आणि नियमित वैद्यकीय चाचण्या केली पाहिजे.’

पुढे ते म्हणाले की, ‘काही माध्यमांना हे नीट समजलं नाही आणि त्यांनी मला कॅन्सर झाल्याची बातमी चालवली. यामुळे विनाकारण गोंधळ निर्माण झाला. अनेक हितचिंतक मला फोन आणि मेसेज करत आहेत. माझं हे स्पष्टीकरण त्या सर्वांसाठी आहे. मी पत्रकारांनाही आवाहन करतो की विषय पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय असं काही लिहू नका. यामुळे अनेकजण माझ्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहेत.’ ही अफवा पसरवल्यामुळे चिरंजीवींनी संताप व्यक्त केला आहे. चिरंजीवी यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, चिरंजीवी लवकरच ‘भोला शंकर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात मन्ना आणि किर्ती सुरेश यांच्या देखील मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटाचे मेहेर रमेश यांनी दिग्दर्शन केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button