ताज्या बातम्या

पत्नीची Love story ऐकून भावुक झाला पती, लग्नानंतर 20 दिवसांनी स्वतःच प्रियकराकडे सोपवलं


झारखंडमधील पलामू येथून एक हृदयस्पर्शी प्रेमकहाणी समोर आली आहे. खरं तर यात एका वराने लग्नाच्या 20 दिवसांनंतरच आपल्या वधूला तिच्या 10 वर्षांपासूनच्या प्रियकराकडे सोपवलं.



झारखंडची ही प्रेमकहाणी ऐकून लोक म्हणत आहेत की ही कथा बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’सारखी आहे. या सिनेमातही पती पत्नीला तिच्या प्रियकराच्या हवाली करतो. एवढंच नाही तर पत्नीचा प्रियकर शोधण्यात तो स्वतः मदत करतो. या चित्रपटात सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण पलामू जिल्ह्यातील बीचकिला गावाशी संबंधित आहे. गावातील सनोज सिंगचा 20 दिवसांपूर्वी प्रियंकासोबत विवाह झाला होता. पण प्रियंका गेल्या 10 वर्षांपासून जितेंद्र विश्वकर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच नाही तर नववधूने लग्नानंतर प्रियकरासह सासरच्या घरातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र ती यशस्वी होऊ शकली नाही.

गावकऱ्यांनी वधू आणि तिच्या प्रियकराला पकडून नंतर वराच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं.

विवाहित असूनही नवरी प्रियकराशी फोनवर सतत बोलत असे. एक दिवशी असं झालं की नवरीचा प्रियकर तिच्या सासरच्या घरी पोहोचला आणि मग दोघेही गुपचूप गावातून फरार झाले. मात्र हे करत असताना गावातील लोकांनी त्यांना पाहिलं आणि ते पकडले गेले.

यानंतर, नवरदेवाला घटनास्थळी बोलावलं असता, वधू आणि तिच्या प्रियकराने सांगितलं की, ते गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत. वधू आणि तिच्या प्रियकराने असंही सांगितलं की केवळ जातीच्या मतभेदामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. मुलीचं लग्न तिच्या संमतीशिवाय झालं होतं. ती तिच्या पतीसोबत राहिली तरी दोघेही कधीच सुखी संसार करू शकले नसते. हे सर्व ऐकल्यानंतर नवरदेवाने पत्नीला तिच्या प्रियकराच्या स्वाधीन केलं आणि तुम्ही दोघेही सुखी राहा, असं सांगितले. मी खरं प्रेम वेगळं करू शकत नाही, असंही तो म्हणाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button