महाराष्ट्र सरकार निवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढवणार..
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/04/Screenshot_20230407_160034-1.jpg)
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याच्या निवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढू शकते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
राजपत्रित अधिकारी महासंघाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवृत्तीचे वय ६० वर्षांपर्यंत वाढवण्याचे समर्थन केले आहे.
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, अधिकारी महासंघाचे संस्थापक तसेच मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष विष्णू पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय 2 वर्षांपर्यंत वाढवले जाऊ शकते. यावर सरकार विचार करत आहे. सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे केले जाऊ शकते. बैठकीत अधिकारी संघटनेने केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावर त्यांनी सहमती दर्शवली आहे.