ताज्या बातम्या

दिंडीत घुसला भरधाव कंटेनर ; चार जण ठार तर आठ जण जखमी


शिर्डी वरून आळंदीसाठी निघालेल्या (Alandi)दिंडीत भरधाव कंटेनर घुसून अपघात झाला. या अपघातात चार वारकरी ठार झाले असून आठ वारकरी जखमी झाले आहेत.



अपघात नाशिक पुणे महामार्गावर खंदरमाळवाडी परिसरात घडला

कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

ताराबाई गंगाधर गमे ( रा . कोऱ्हाळे,ता . राहता ), भाऊसाहेब नाथा जपे (रा. कानकुरी ,ता . राहाता )बबन पाटील(रा. राहता ) , बाळासाहेब गवळी (रा . कोपरगाव ) अशी मृतांची नावे आहेत . जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिर्डीपासून काही अनंतरावर निमगाव येथे संत ज्ञानेश्वर (alandi)महाराजांचे मंदिर आहे. दरवर्षी तेथून शिर्डी ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. शिर्डी आणि आजूबाजूच्या गावांमधून वारकरी या दिंडीत मोठ्या संख्यने सहभागी होतात. हि दिंडी शिर्डीहून संगमनेरमार्गे नाशिक पुणे महामार्गाने आळंदीकडे जात होती . त्याचवेळी पाठीमागून येणारा भरधाव कंटेनर दिंडीत घुसला. वारकऱ्यांना कंटेनरची धडक बसली आणि हा अपघात घडला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button