नाशिकमहत्वाचेमहाराष्ट्र

थेट सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात येणार


नाशिक शहर पोलिसांक डे कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, सोशल मीडियावर अश्लील टीका संदर्भात 1200 तक्रारी आल्या होत्या.
पोलिसांनी गांभीर्य ओळखत कारवाई सुरू केली. पोलिसांनी 1200 पैकी 740 तक्रारी निकाली काढल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. तर नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने सुरु केलेला सायबर सेलच्या माध्यमातून कामगिरी उल्लेखनीय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार, बालविवाह व महिलांसंबंधी असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. वाढत्या सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने सायबर सेलच्या माध्यमातून महिला तक्रार निवारणासाठी स्वतंत्र विभाग सुरु केला आहे. या विभागाच्या माध्यमातून महिलांच्या तक्रार निवारण करण्यासाठी सायबर सेलची कामगिरी उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

राज्याच्या महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, नाशिकच्या सायबर सेलने बाराशे तक्रारीपैकी 740 तक्रारी निकाली काढल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी किंवा फसवणूक होत असलेल्या महिलांनी 1093 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. निर्भया पथकाच्या माध्यमातून तक्रार करण्यासाठी शहरी भागासाठी 1091 आणि ग्रामीण भागासाठी 112 टोल फ्री क्रमांकाबरोबरच नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने स्वत:चे चार टोल फ्री क्रमांक तयार करुन महिलांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी चांगल्या प्रद्धतीचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे, असे चाकणकर यांनी सांगितले.

कौटुंबिक वाद, कौटुंबिक अत्याचाराच्या घटना मिटविण्यासाठी भरोसा सेलच्या माध्यमातून समुपदेशन करुन भरोसासेल चांगल्या पद्धतीने सक्षम होते. त्यामुळे पोलीसाकडे येणाऱ्या तक्रारींचा निपटारा लवकर होण्यास मदत आहे. कोरोनाकाळात बालविवाहांचे प्रमाण वाढलेले होते. बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्यावतीने युद्धपातळीवर प्रभावी यंत्रणा राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, संरपच यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले, असेही चाकणकर यांनी सांगितले.

वर्षभरात एकच बालविवाह
महिला व मुलींसाठी नाशिक शहर हद्दीत 1091 आणि ग्रामीण हद्दीत 112 या क्रमांक मदतीसाठी कॉल करावा. कोरोना काळात बालविवाह आणि कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले होते. आता ते कमी झाले आहे. शिवाय अशी घटना आढळल्यास थेट सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर नाशिक शहरात 2022 मध्ये अवघा एकच बालविवाह झाला असून पुढील वर्षी एकही बालविवाह नसेल. नाशिक शहर सायबर सेलने महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी केलेले कामकाज प्रसंशनीय असून, इतर जिल्ह्यांमध्येही नाशिक शहर सायबर सेलप्रमणे काम केले पाहिजे. नाशिक शहरापेक्षा नाशिक ग्रामीणमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button