ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भर पावसात छत्री घेऊन कृषीमंत्री अब्दुल सत्तार नुकसानीच्या पाहणीसाठी बांधावर


कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सिल्लोड तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
नुकसानग्रस्तांशी संवाद साधत चिंता करू नका सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दांत मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.



अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

कृषीमंत्री सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातील मंगरूळ, हट्टी, सासुरवाडा, खुल्लोड, निल्लोड, बाभूळगाव, गेवराई सेमी आदी भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बऱ्याच ठिकाणी विजेचे खंबे पडल्यामुळे काही गावांत वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे, त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने देखील दक्ष राहून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

तर अवकाळी पावसामुळे पीक अक्षरशः आडवी झाली आहे. दरम्यान सत्तार यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तर नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिली.

तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उभं केलेले लोखंडी शेड वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पडले आहे. तर सत्तार यांनी अशा शेडची देखील पाहणी केली.

सोबतच सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने काही घरांची पडझड झाली असून, कृषीमंत्री यांनी पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button