ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गिरणीच्या पट्ट्यात अडकून जखमी झालेल्या मालकाचा मृत्यू


रत्नागिरी : (आशोक कुंभार ) पिठाच्या गिरणीतील पट्ट्यात पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या मालकाचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान शनिवारी (२ एप्रिल) रात्री मृत्यू झाला.ही घटना १ एप्रिल राोजी सायंकाळी ७ वाजता रत्नागिरी शहरातील रामआळी येथे घडली होती. अनिल भार्गव पोटफोडे (५७) असे त्यांचे नाव आहे.



शहरातील तेली आळी येथे अनिल पोटफोडे यांचे घर आहे. त्यांची रामआळी येथे पीठ व मसाला गिरण आहे. शनिवारी सायंकाळी गिरणीमध्ये काम करत असताना गिरणीच्या पट्ट्यात त्यांचा पाय अडकला. त्यानंतर ते मशीनमध्ये खेचले गेले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती.

या घटनेनंतर परिसरातील व्यावसायिकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला. रविवारी त्यांचा मृतदेह रत्नागिरीत आणण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button