ताज्या बातम्या

मामाने भाचीच्या लग्नात खर्च केले 3 कोटी रुपये


राजस्थान:राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील एका लग्नाची देशभरात चर्चा होत आहे, जिथे तीन मामांनी आपल्या भाचीच्या लग्नात 3 कोटी 21 लाख रुपये खर्च केले. सोबतच बहिणीला पैशाने सजवलेली ओढणी घातली.
हा विवाह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील जयल भागातील झाडेली गावातील आहे.येथे राहणारे घेवरी देवी आणि भंवरलाल पोतलिया यांची मुलगी अनुष्का यांचे बुधवारी लग्न झाले. यादरम्यान बुर्डी गावचे रहिवासी अनुष्काचे आजोबा भंवरलाल गरवा हे आपल्या तीन मुलांसह हरेंद्र, रामेश्वर आणि राजेंद्र लग्नासाठी आले होते. त्यांनी यावेळी कोट्यवधी रुपयांचा हुंडा घेऊन आले.भाचीच्या लग्नात 3.21 कोटी हुंडा

नाना भंवरलाल गरवा यांनी त्यांची नात अनुष्का हिला 81 लाख रुपये रोख, नागौरमधील रिंग रोडवर 30 लाखांचा प्लॉट, 16 बिघा जमीन, 41 तोळे सोने, 3 किलो चांदी, धान्याने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एक स्कूटी दिली आहे. घेवरी देवीने वडील आणि भावांचा हा सन्मान पाहिला तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.खरे तर राजस्थानमध्ये बहिणीच्या मुलांच्या लग्नात मातृपक्षाकडून मायरा भरण्याची (हुंडा देणे) प्रथा आहे. सर्वसाधारणपणे याला भात भरणे असेही म्हणतात. या विधीमध्ये मातृपक्षाकडून बहिणीच्या मुलांना कपडे, दागिने, पैसे आणि इतर वस्तू दिल्या जातात. यामध्ये बहिणीच्या सासरच्या मंडळींसाठी कपडे आणि दागिनेही दिले जातात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button