व्हिडिओ न्युज

VIDEO: मजुरी करण्यास नकार दिल्याने उलटं लटकावून मारलं; हात बांधून मुंडन केले अन् गावातून फिरवलं


यूपीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची चर्चा तर जोरदार होत असते. काही लोकांवर त्याचा काहीच परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. ते आपले वर्चस्व दाखवत राहतात. त्यांच्यावर ना कायद्याचा धाक दसतो ना सरकारच्या काटेकोरपणाचा परिणाम.

 

असाच एक प्रकार झाशीतून समोर आला आहे. येथे म्हशीला चारा घालण्यास व शेण उचलण्यास नकार दिल्याने मजुरासोबत क्रौर्याचा कळस गाठल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मजुराला आधी झाडाला उलटे लटकवून बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर त्याचे हात बांधून त्याचे मुंडन करण्यात आले. त्यानंतर त्याला संपूर्ण गावातून फिरवण्यात आले. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एक्सवर मजुराचे डोके मुंडवल्याचा व्हिडिओ पोस्ट करून काँग्रेसने योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सिपरी बाजारमधील एका गावातील आहे.

व्हिडिओ येथे पहा

झाशीच्या सिपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एका मजुराने आरोप केला आहे की, काही गुंड त्याला म्हशीचे शेण उचलून शेतात काम करण्यास जबरदस्ती करत होते. त्याने काम करण्यास नकार दिल्यावर त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुंडांनी या व्यक्तीला गाव सोडून निघून जाण्याची धमकी दिली आणि येथे राहायचे असेल तर हे काम करावे लागेल, असे सांगण्यात आले.

 

मजुराने आरोप केला की, बुधवारी तो शेतात मजुरी करत असताना ताकोरी गावातील विजय, नकुल, शत्रुघ्न आणि कालू हे तिघेही शेतात आले आणि त्यांनी त्याला ओढून रस्त्यावर आणले व नंतर कारमधून टाकोरी गावात नेले. या तरुणाचा आरोप आहे की, सर्व आरोपी गावाच्या मधोमध सर्वांसमोर मुंडन केले व नंतर त्याला गावातून फिरवले. गावातून फिरवल्यानंतर त्याला झाडाला उलटे लटकवून मारहाण केली. या प्रकरणी तरुणाने सिपरी बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या घटनेचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने लिहिले की, झाशीमध्ये एका मजुराचे हात बांधून त्याचे केस जबरदस्तीने कापण्यात आले. कार्यकर्ता त्याच्या सुटकेसाठी विनवणी करत राहिला पण घटनास्थळी उपस्थित लोक हसत राहिले. मजूर म्हणून काम करण्यास नकार दिल्याने कामगाराला मारहाण केली.

 

गुंडांना कोणी काम करण्यास ही नकार देऊ शकत नाही का? इच्छा नसतानाही एखाद्याला काम करण्यास भाग पाडणे कितपत योग्य आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम २३ आणि २४ मधील शोषणाविरुद्धच्या अधिकाराला काही अर्थ आहे की नाही?

राज्यात मजूर आणि कामगारांवर असे अत्याचार झाले आहेत. त्यांच्या हक्कांचे सातत्याने उल्लंघन होत असून राज्य सरकार डोळ्यांवर पडदा टाकत आहे. कामगारांना सन्मान नाही का? त्यांना त्यांचा हक्क कधी मिळणार? असे सवाल काँग्रेसने उपस्थित केले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button