अवकाळी पाऊस कोसळणार! ‘या’ 4 जिल्ह्यांमध्ये 48 तास गारपिटीचा हायअलर्ट

महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल
होत असून, पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट (Weather Alert) जारी करण्यात आला आहे.
विशेषतः भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा मोठा धोका असून हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात अनेक भागांत अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. काही भागांत वादळी वारे आणि विजांचा कडकडाटही पाहायला मिळाला आहे. विदर्भात ब्रह्मपुरी येथे तापमान तब्बल ४५.९ अंश सेल्सियस नोंदले गेले असून, तिथे उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२६ एप्रिल:
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा. (Rain Alert)
२७ एप्रिल:
रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत वादळी वारे व मुसळधार पावसाचा इशारा.
२८ एप्रिल:
नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अलर्ट कायम राहणार आहे.
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने आवाहन केले आहे. (Maharashtra Weather Alert)
राज्यातील नागरिकांनी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट लक्षात घेता सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.










