ताज्या बातम्यानागपूरमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

‘..तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री असते’ राष्ट्रवादीच्या आमदाराने मनसेला डिवचलं, म्हणाले नुसतं भाषण..


नागपूर, : नुसतं भाषण देऊन झालं असतं तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री झाले असते. त्यांचे 15 चे 50 आमदार झाले असते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबीर नागपुरात होत आहे. त्याचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अमोल मिटकरी यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांवर टीका केली. काय म्हणाले अमोल मिटकरी? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.



मिटकरी म्हणाले, नुसतं भाषण देऊन झालं असतं तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री झाले असते. त्यांचे 15 चे 50 आमदार झाले असते. अजित पवार यांना विनंती आहे की आमच्या मित्र पक्षातील काही वाचळविरांना आवरा नाही तर आपल्या पक्षात देखील बोलणारे लोक आहेत. मोदींनी नवीन संसदेचे उद्घाटन केलं म्हणून ते पुन्हा पंतप्रधान होतील हे सांगता येत नाही.

72 वर्षानंतर आरएसएस पद देत नाही मोदींचे वय 73 वर्ष आहे. मोदी थकले हे दाखविण्यासाठी यूपी मध्ये एन्काउंटर करून नव्या दमाचे नेतृत्व दाखवलं असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्षात भाषण देणारा आमदार होतो. पण भाजपमध्ये खोटं बोलणारा पंतप्रधान होतो.

खोटं हिंदुत्व ओबीसींवर लादण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. शिवाजी महाराजांचे राज्य मराठा भोसले यांसाठी नाही तर स्वराज्य होते, बलुतेदार सुखाने जगत होते. शिवाजी महाराजांचे हिंदू राष्ट्र हेच आमचं ध्येय असल्याचं मोहन भागवत सांगतात. थुंकणे ही आमची संस्कृती होती, अस सांगितल जातं.

आमची लढाई मंदिर मस्जिदसाठी नाही तर आमची लढाई सत्तापिपासू लोकांशी आहे जे माणसं मारत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. या आधीच्या रेल्वे मंत्र्यांनी अपघात झाल्यास नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला. ज्याच्याकडे नैतिकता आहे तोच राजीनामा देतो, असं म्हणत भाजपच्या रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मिटकरी यांनी केली. खारगरमध्ये ओबीसी लोकांना मारलं, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता.

सँगोल म्हणजे तुमच्यावर धर्माचा अंकुश राहील. सम्राट अशोक यांचं चिन्ह बदलविण्यासाठी सँगोल आणलं असल्याचं मिटकरी म्हणाले. संसदेत पुजारी आणायला विमान जातं आणि पुलवामामध्ये 40 जवानांना विमान मिळालं नाही. जातीय तेढ निर्माण करणे हे तुमचं हिंदुत्व आहे का? मी मोहन भागवत यांना आवाहन देतो. त्यांनी शिवाजी महाराज यांचं राज्य हिंदू राज्य होतं हे सिध्द करून दाखवाव. ओबीसी भावनिक आणि साधा आहे.

मोदींनी देहूत विठ्ठलाचे नाव घेतले तरी मोदी मोदी करतात. शहराला अहिल्याबाई होळकर नाव देऊन प्रश्न मिटणार आहे का? दिल्लीत महाराष्ट्र सदन मध्ये पुतळा हटवला त्यावर पडदा टाकण्यासाठी हे काम केल्याचं मिटकरी म्हणाले. भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला त्यांचा अभिनंदन ठरव भाजपने आणला.

ब्रिजभूषण सिंग विरोधात चित्रा वाघ का बोलत नाही. भाजपला भाजपचे नेते चालत नाही, पंकजा मुंडे, खडसे, बावनकुळे यांचं भाजपने काय केलं? ज्या सनातनची शपथ काल मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यांनीच राज्याभिषेकाला विरोध केल्याचं मुख्यमंत्री विसरले का? भाजपला महिला चालत नाही, एक महिला मंत्री नाही, महिला राष्ट्रपती संसद उद्घाटनाला चालत नाही, ब्रिजभूषणला अटक केली जात नाही, अशा आरोपांच्या अमोल मिटकरी यांनी झाडल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button