शेत-शिवार

मिचाँग चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल; महाराष्ट्रासह १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोळणार


बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर मिचाँग चक्रीवादळात झालं. या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. डोंगराळ भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे.



यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्रासह, १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही राज्यांमध्ये गारपीट होऊ शकते, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

मिचाँग चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना चांगलाच तडाखा दिला. चेन्नईत अतिमुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे. या पावसाने आतापर्यंत १७ जणांचा बळी घेतला आहे. मुसळधार पावसाने चेन्नईतील जनजीवन विस्कळीत आहे.

स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, आज ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढू शकतो. पुढील ४८ तासांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस पडू शकतो.

झारखंड, बिहारचा काही भाग, दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही प्रमाणात हलका पाऊस पडेल. ८ आणि ९ डिसेंबरला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button