ताज्या बातम्या

बळीराजासाठी जरांगेचा पुढाकार, मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांसाठी लढा देणार


मनोज जरांगे यांच्यासोबत एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. ‘शेतीविषयक सगळ्याच नेत्यांची उदासीनता आहे, मी माझ्या डोळ्याने बघतोय. शेतकऱ्यांचे प्रचंड वाईट हाल आहेत. मराठवाड्यात आणि विशेषता खानदेशात या नेत्यांना पाणी आणायला काय रोग झालाय का?



 

शेतकऱ्यांना मदत सुद्धा वेळेवर मिळत नाही एक रुपयाचा विमा काढून ठेवलाय, तो काय कामाचा नाही. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आज या अस्मानी संकटामुळे शेतकरी बेजार झाला आहे, फाशी घ्यायला लागलाय शेतकऱ्यांना तुम्हाला आडवं केल्याशिवाय पर्याय नाही. आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणार”, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

 

ओबीसी नेत्यांकडून जातिवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.मराठा आरक्षणासाठी आम्ही मुदत दिलेली नाही, सरकारने मुदत मागितली होती. 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला वेळ द्या आम्ही आरक्षण मिळवून देतो, असं सरकारनं सांगितलं होतं. नोंदणीच्या आधारावर कायदा पारित करून आरक्षण देऊ असे सांगण्यात आले होते, पण काही लोक स्वतःला ओबीसींचा नेता म्हणत जातिवाद करण्याचा प्रकार करत आहेत. धनगर, वंजारी यांचा आरक्षणाला धक्का लागणार नाही, कारण त्यांचा प्रवर्ग वेगळा आहे. आम्ही ओबीसी आरक्षणातून आरक्षण मागत आहोत, तो आमचा हक्क आहे, त्यात काही गैर नाही, धनगर बांधवांचा गैरसमज होतो आहे. तो फक्त धनगरांचा वापर करत आहे. धनगर आरक्षणाबद्दल त्याची भूमिका तो मांडत नाही त्याने भूमिका स्पष्ट करायला हवी. मंत्री छगन भुजबळ यांचं नाव न घेता मनोज जरांगे यांनी टोला लगावला आहे. धनगर वंजारी समाजाने मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. अशी विनंती ही त्यांनी केली

जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधत म्हटलं आहे की, महापुरुषांचा जाती काढतो. तो ओबीसींचा नेता म्हणून घेतो स्वतःला, त्यांचा ऐकून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार का, हे आम्ही सहन करणार नाही. त्याचं ऐकून जातीय तणाव निर्माण करू नका. आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे. आता नोंदी मिळाल्यात त्या नोंदीच्या आधारावर मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झाला आहे. तरीही हा छगन भुजबळ म्हणतो, मराठ्यांना आरक्षण देऊ नका तर तुम्ही त्याचं कसं ऐकू शकता. बदनापूरच्या आमदाराने विनाकारण रावसाहेब दानवे यांचे नाव घेतलं, ओबीसी नेते आता त्यांचं नाव घ्यायला लागले, म्हणजे भाजपचे नेते आमचा गेम करायला लागले आहे, का असा सवाल जरांगे यांनी विचारला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button