लोकशाही विश्लेषण

असे दान केल्याने लागाल भिकेला, चाणक्य नीतिनुसार मनुष्याने …


चाणक्य नीतिमध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आचार्य चाणक्य यांची विचारसरणी सर्वसामान्यांपेक्षा थोडी वेगळी होती. हेच नाही तर आचार्य चाणक्य यांनी अगदी कमी वयातच वेद आणि पुराणांचे ज्ञान घेतले होते.



आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्र आणि रणनीतीमध्ये तज्ज्ञ होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त वाचले जाणारे म्हणजे त्यांचे नीतिशास्त्र हे पुस्तक आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर अनेक समस्या आयुष्यातील दूर होण्यास मदत होईल.

आचार्य चाणक्य यांनी दान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे सांगितले आहे. हेच नाही तर जर आपण जा गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर दान केल्याने आपण स्वत: कंगाल व्हाल. यामुळे दान करताना नेहमीच आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो कराव्यात. या गोष्टी नेमक्या कोणत्या हे पाहा.

 

दान देताना आपली आर्थिक स्थिती पाहा

 

बऱ्याचवेळा अनेक लोक दान देताना आपल्या आर्थिक स्थितीकडे लक्ष देत नाहीत. दान करणे चांगले आहे, दान केल्याने आपली प्रगती होते आणि संपत्ती वाढते हे बरोबर आहे. मात्र, कधीही आपल्या क्षमतेपेक्षा अधिक दान देणे टाळावेच. यामुळे तुमचे नुकसान देखील होऊ शकते.

 

या गोष्टीमुळे समस्यांमध्ये होऊ शकते वाढ

 

जर आपण कोणताही विचार न करता दान केले तर आपल्याच समस्यांमध्ये वाढ होऊ शकते, असे चाणक्य नीतिमध्ये स्पष्ट सांगण्यात आलंय. यामुळे फायदा नाही तर उलट नुकसानच होईल. चाणक्य नीतिनुसार व्यक्तीने इतकेच दान करायला हवे, जेवढे तो करू शकतो.

 

दान करणे चांगले पण हे लक्षात ठेवा

 

इतिहासामध्ये असे बरेच लोक आहेत, ज्यांनी इतके जास्त दान केले की शेवटी त्यांनाच भिकेला लागण्याची वेळ आली. यामुळे चाणख्य नीतिमध्ये हे स्पष्ट सांगण्यात आले आहे की, दान करताना विचार करूनच करा. चाणक्य नीतिमध्ये अनेक गोष्टींबद्दल लोकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button