महाराष्ट्र

मनोज जरांगेंच्या उपोषणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ओबीसी आणि मराठा.’


मुंबई : मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व मागण्या संदर्भात सरकार संवेदनशील आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.



मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा संदर्भात देखील सरकार गांभीर्याने विचार करत आहे. ओबीसी समाज आणि मराठा समाज दोन्ही समाजाशी समन्वय साधण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आपण स्वतः या संदर्भात ओबीसी नेत्यांची चर्चा केली असून मराठा समाजाला सगेसोयरेतून आरक्षण दिल्याने ओबीसींचे काहीही नुकसान होणार नसल्याचा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणादरम्यान त्यांनी अन्न- पाणी देखील घेतलेले नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार करण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाचे हे आंदोलन राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

जरांगेंनी सुरू केलेल्या उपोषणा संदर्भात राज्य सरकार गंभीर्याने विचार करत आहे. त्यांना सरकारच्या वतीने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू आहे. जाळपोळी व्यतिरिक्त मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया ही जलद गतीने सुरू आहे. तसेच सगेसोयरे संदर्भातली पहिली नोटिफिकेशन राज्य सरकारने जारी केली आहे. या संदर्भात आक्षेप मागवण्यात आले आहेत. तसेच ओबीसी नेत्यांशी देखील मी स्वतः चर्चा करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button