
मो ठी बातमी समोर येत आहे, पहलगामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पीओकेमधील 5 तर पाकिस्तानमधील 4 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानकडून बुधवारी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर आता पाकिस्तानला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
पाकिस्ताननं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यानंतर भारतानं आज सकाळपासून पाकिस्तानवर ड्रोन हल्ल्याला सुरुवात केली आहे. भारतानं पाकिस्तानच्या 12 शहरांवर ड्रोन हल्ला केला आहे, आतापर्यंत पाकिस्तानवर पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. भारतानं पाकिस्तानच्या लाहोरमधील रडार सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांची रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती भारताच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, भारतानं पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनं पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाहोर सोडा किंवा जीव वाचवा असं अमेरिकन सरकारनं आपल्या पाकिस्तानमधील नागरिकांना सांगितलं आहे. पाकिस्तान दुतावासातील अमेरिकन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न
भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तामधल्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पीओके आणि पाकिस्तानमध्ये असलेले एकूण 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, या कारवाईनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला.
पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर आता भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या घरात घुसून प्रत्युत्तर दिलं आहे. लाहोरमधील रडार सिस्टिम भारतानं उद्ध्वस्त केली आहे, पाकिस्तानच्या बारा शहरांवर भारताकडून 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. त्यानंतर अमेरिकेनं पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाहोर सोडा किंवा जीव वाचवा असं अमेरिकनं सरकारनं म्हटलं आहे.