मोठी बातमी ! पाकिस्तानने डागले क्षेपणास्त्रं ! भारतीय वायूदलाच्या यंत्रणेने केले निष्क्रिय …

भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांची 9 प्रशिक्षण तळं नष्ट केली. यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ असा इशारा दिला आहे.
भारताची सक्षमता आली दिसून
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र माऱ्यांना तत्काळ आणि चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे संभाव्य हाणी टळली. यात भारताची संपर्क यंत्रणा आणि वायूदल किती दक्ष आहे याचाच प्रत्यय यानिमित्ताने आपल्या शत्रूराष्ट्राला आला आहे. या प्रतिसादाचे वर्णन क्लिनिकल आणि नियंत्रित असे करण्यात आले आहे, पश्चिम सीमेवरील उच्च तयारी दर्शवते.
व्हिडिओ येथे पहा !
कोणतीही जीवीतहाणी नाही
रिपब्लिक न्यूजने दिलेल्या वृ्त्तानुसार, पाकने क्षेपणास्त्र डागल्यानंतर कोणतीही नागरी जीवितहानी किंवा पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी प्रक्षेपणांच्या उत्पत्ती आणि स्वरूपाचा पुढील तपास करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
गुरुद्वाराजवळ एक तोफगोळा पडला, ज्यामुळे त्याच्या बाह्य रचनेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. गुरुद्वाराच्या भिंतींवर गोळीबाराच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
संशयास्पद ड्रोन स्फोट
भारत-पाकिस्तान सीमेजवळ, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडा भागात हाय-टेन्शन पॉवर लाईनशी आदळल्यानंतर एक संशयास्पद ड्रोन स्फोट झाला. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु त्यामुळे मोठा सुरक्षा इशारा देण्यात आला आहे.
व्हिडिओ येथे पहा !
पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या
ऑपरेशन सिंदूरच्या एक दिवसानंतर, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ शहरातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करून विनाकारण तोफगोळ्यांचा मारा केला. त्यानंतर फायरिंगही केली होती. दरम्यान, आता पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या असून गोळीबारासारख्या घटना आणि ड्रोनची घुसखोरी, सायबर हल्ले आणि सीमेलगत सुरु असलेल्या दहशतवादी हालचालीमुळे गुप्तचर संस्था अतिदक्षता बाळगून आहेत.