देश-विदेश

“साहेब, आता तरी माफ करा.”, ऑपरेशन सिंदूरनंतर लागलीच पाकिस्तानातून फोन …


पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणावर भारताने बुधवारी मध्यरात्री जोरदार हल्ला चढवण्यात आला. ड्रोनद्वारे मिसाईल डागण्यात आली.

यामध्ये दहशतवादी, त्यांचे अब्बाजान ठार झाले. दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त झाले. भारताच्या या हल्ल्याने पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसला. भारताने ऑपरेशन सिंदूर पुढे न राबवण्याची घोषणा केली आहे. पण पाकड्यांची खुमखुमी काही कमी झालेली नाही. पाकिस्तानने रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. पीएम शहबाज शरीफ यांनी हल्ला करण्याची पोकळ धमकी दिली आहे. योग्य उत्तर कसं द्यायचे हे पाकिस्तानला माहिती असल्याचा दावा त्याने केला.

पण भारताने जेव्हा हल्ला चढवला त्यावेळी एक मोठी घटना घडली. ऑपरेशन सिंदूरनंतर लागलीच हा फोन आला. पाकचे NSA असीम मलिक यांनी अजित डोभाल यांच्याशी संपर्क केला. त्याची आता चर्चा रंगली आहे.

 

उपपंतप्रधानांनी दिली माहिती

अजित डोभाल यांच्याशी असीम मलिक यांनी तातडीने संपर्क साधला. याविषयीची माहिती पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी एका मुलाखतीत दिली. टीआरटी वर्ल्ड या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात एनएसए स्तरावर संपर्क झाल्याचे ते म्हणाले.

 

गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशात कोणताही संपर्क अथवा चर्चा झाली नव्हती. पण ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सल्लामसलत झाल्याचे ते म्हणाले. दहशतवाद आणि चर्चा हे एकाच वेळी सुरू ठेवण्यात येऊ शकत नाही, हे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानवर एक प्रकारे बहिष्कार टाकला आहे.

 

पाकची टरकली

भारताने पाकिस्तानमध्ये घुसत दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. भारत अशी कारवाई करेल याची अपेक्षा पाकिस्तानला नव्हती. पाकिस्तानला हल्ल्याची भीती होती. पण याप्रकारे एअर स्ट्राईक होईल याची त्यांना खात्री नव्हती. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केवळ दहशतवादी ठिकाणांवरच हल्ला करण्यात आला. लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नाही हे भारताने स्पष्ट केले. या हल्ल्याने जगात पाकची नाचक्की झाली आहे. डोभाल आणि मलिक यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती मिळाली नसली तर परराष्ट्रमंत्र्यांचा सूर पाहता पाकिस्तानने हल्ले थांबवण्याची विनंती केल्याचे स्पष्ट होत आहे.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बळेबळेच आता युद्धाची भाषा केली आहे. देशाला संबोधित करताना त्यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी दिली. त्यामुळे दोन्ही देशात युद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. रशियासह अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी भारताची कारवाई योग्य ठरवली आहे. त्यामुळे पाकिस्तानने आगळीक केली तर ते त्याला महागात पडण्याची शक्यता अधिक आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button