भारताने पाकिस्तानचं पाणी थांबवलं; दहशतवादी हल्ल्यानंतर घेतले पाच मोठे निर्णय …

काश्मीरच्याजम्मू पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.
या घटनेनंतर जगभरातून संपात व्यक्त होत होता. मोदी सरकारी कोणतं कठोर पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर मोदींनी सीसीएसची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पाच कठोर निर्णय घेण्यात आलेले आहेत. पाकिस्तानवर एक प्रकारे कायदेशीर स्ट्राईक भारताने केला आहे. बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.
भारत सरकारचे पाच मोठे निर्णय
१९६० साली लागू झालेला सिंधू पाणी करार भारताने स्थगित केला आहे. पाकिस्तानवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
अटारी बॉर्डर बंद करण्यात आलेली आहे. भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये असतील तर त्यांनी १ मेपर्यंत माघारी यावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा बंद करण्यात आलेला आहे.
एका आठवड्यामध्ये भारतात असलेल्या पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी देश सोडावा, असे आदेश देण्यात आलेले आहेत.
भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना पाकिस्तानात माघारी जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.