रुपाली ठोंबरे पाटील काश्मीरमध्ये अडकल्या; व्हिडीओ शेअर करत सरकारला केली विनंती

जम्मू काश्मीरमधील (Jammu & Kashmir) प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम (Pahalgam) येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणात महाराष्ट्रातील (Maharashtra) अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) या कुटुंबासह अडकल्या आहेत.
अधोरेखित केले.
मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तातडीने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी रात्रीच काश्मीरला रवाना झाल्याचे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपला सौदी अरेबियाचा (Saudi Arabia) दौरा अर्धवट सोडून देशात परतल्याचे वृत्त आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या अंदाजानुसार, सध्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्र, गुजरात (Gujarat) आणि कर्नाटक (Karnataka) येथील नागरिकांचे प्रमाण ८० ते ९० टक्के आहे.
या दुर्दैवी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये डोंबिवली (Dombivli) येथील संजय लेले (Sanjay Lele) (वय ४४), अतुल मोने (Atul Mone) (वय ५२), हेमंत जोशी (Hemant Joshi), पनवेलमधील (Panvel) दिलीप देसले (Dilip Desale), तसेच पुण्यातील (Pune) संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांचा समावेश आहे. अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी तातडीने विमानसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.