
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाहिये. राज्यातील कोरोनाचा आलेख वाढलेलाच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ३६९ रुग्ण आढळले आहेत.
२४ तासांत ५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ९१० वर पोहोचला आहे. गेल्या २४ तसांत १ हजार ४०२ रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख ९१ हजार ५५५ वर पोहोचली आहे. सध्य राज्यात २५ हजार ५७० रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.