ताज्या बातम्या

अवकाळी पावसामुळे बाधित शेतकर्‍यांना 401 कोटींची मदत


ठाणे: अवकाळी पावसामुळे बाधित शेतकर्‍यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने सोमवारी 401 कोटी 70 लाखांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे 2021 आणि 2022 मधील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लवकरच ही रक्कम संबंधित शेेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

राज्यात 2021, 2022 आणि 2023 मध्ये सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेतकर्‍यांचे अतोनात शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदतीचे प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आले आणि त्यावर आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्षात सरकारी तिजोरीतील आर्थिक चणचण आणि अन्य कारणांमुळे शेतकर्‍यांना मदत मिळू शकलेली नाही.
अखेर राज्य सरकारने सोमवारी 2021 व 2022 या वर्षातील गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे, बहुवार्षिक पिकांचे नुकसान व मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित शेतकर्‍यांना मदत वाटपासाठी 401 कोटी 70 लाख 70 हजारांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. आता शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी होऊ शकेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button