ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्रशेत-शिवार

शेतकऱ्यांचे हाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांची भेट घेणार- विठ्ठल पवार राजे


पुणे : ( आशोक कुंभार ) मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील कृषी उत्पादक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन खंडित करता येणार नाही, असे सक्त आदेश राज्य अन्न आयोगाने दिलेले आहेत, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांचे सह्याद्री अतिथीग्रहा येथे झालेली बैठक, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सक्त आदेशानंतर, 10 डिसेंबर रोजी महावितरण चे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक विजय सिंगल प्रकाश गड मुंबई महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन खंडित करू नये व कोणती सक्तीची वीज बिल वसूल करु नये, आदेशात कसूर करू नये असे सक्त आदेश काढलेले असतानाही, राज्यातील पुणे अहमदनगर हिंगोली गोंदिया गडचिरोली चंद्रपूर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर औरंगाबाद जालना उस्मानाबाद बीड लातूर नांदेड सह अनेक जिल्ह्य, तालुक्यांमध्ये महावितरणचे अधिकारी, वायरमन आदेशाची पायमल्ली करत, महावितरणचे अधिकारी, कायदा, आदेश जाणीवपूर्वक पायदळी तुडवत आहेत, कोर्ट, व राज्य अन्न आयोग आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आदेश पाळत नसल्यामुळे, कायद्याची पायमल्ली करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यां विरोधामद्ये कंटेंमट ऑफ कोर्ट, कर्तव्यात कसूर व दप्तर दिरंगाई, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक, छळ, शेती पिकांचे आर्थिक नुकसान करत असल्याच्या कारणास्तव महावितरणचे संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या छळ करत, आत्महत्या करण्यास भाग पाडले चे कारणास्तव संबंधितांवर एफ आय आर दाखल करावा व शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशा नुसार यापुढे कधीही खंडित न करता सलग पुरवठा करावा व राज्य अन्न आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने दोन्ही न्यायालयात केलेली होती त्याचे पालन महावितरण करावे या मागणीसाठी राज्यभर शेतकरी संवाद यात्रेचा कार्यक्रम संघटनेने सुरू केलेला आहे…दिनांक 11 मार्च रोजी प्रवरा संगम नेवासा अहमदनगर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान आमदार व माजी राज्यमंत्री आदरणीय ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू साहेब व शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे

यांचे नेतृत्वाखाली, घटनेचे प्रदेश कार्यकारणी समितीचे अध्यक्ष आंबादास कोरडे पाटील यांच्या व प्रहार संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद नगर हायवे नेवासा संगम चौफुला येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.त्यावेळी पुणे नगरहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या हायवेवर सुमारे दहा ते पंधरा किलोमीटरअंतरावर वहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटनेचे प्रदेश कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील व प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष युवा नेते अभिजीत पोटे पाटील उपस्थित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन बेकायदेशीरपणे खंडित केले किंवा शेतकऱ्यांचा आर्थिक, मानसीक, छळ, शेतकऱ्यांच्या पिकाचे आर्थिक नुकसान केल्यास, राज्यातील सर्व संबंधित महावितरण चे अधिकाऱ्यां विरोधात कंटेंट ऑफ कोर्ट, भारतीय घटना पायदळी तुडवत असलेलेने, महावितरणच्या संबंधितांवर नाईलाजास्तव एफ आय आर दाखल करण्याची कारवाई शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात असे राजे पवार यांनी सांगितले.या रस्ता रोको आंदोलनाच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महावितरणचे अधिकारी कायद्याची पायमल्ली करतात हे पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस अधिकारी यांनी “महावितरणचे इंजिनीयर अधिकाऱ्यांना,, आंदोलनास्थळी बोलावून पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष, सलाबपूर सब स्टेशनचे अभियंता काळे, उप अभियंता शरद चेचर यांनी सांगितलेकी यापुढे शेतकऱ्यांचे कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करनार नसल्याची कबुली महावितरणचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अंबादास कोरडे पाटील, अभिजीत पोटे, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, बाळासाहेब खर्जुल, पांडुरंग अवताडे, कृष्णा सातपुते, संघटनेचे बाळासाहेब कोरडे व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी व प्रहार संघटनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावितरण ने कृषी पंपाचे वीज कनेक्शन यापुढे खंडित केले जाणार नाही असे आश्वासन दिल्याच्या नंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे, आम्ही मंत्रालयामध्ये बच्चू भाऊ कडू साहेब, विठ्ठल पवार राजे, अंबादास कोरडे पाटील, अभिजीत पोटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकरच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी भ्रमणध्वनी वरून पत्रकारांशी बोलताना दिली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button